जसपूर : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पोहोचलेल्या ऊस आयुक्तांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पहिल्यांदाच एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शेतकऱ्यांशी संवाद साधल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. ऊस आयुक्तांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले
शुक्रवारी साखर कारखान्याकडून मुरलीवाला गावात आयोजित बैठकीला ऊस आयुक्त हंसा दत्त पांडे, सर व्यवस्थापक ए. के. चन्याल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी त्यांना वेळेवर तोडणी पावती मिळत नसल्याचे सांगितले. त्यांची शेती उत्तर प्रदेशमध्ये येते. त्यामुळे प्रशासन त्यांचे सर्वेक्षण करीत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खते आणि किटकनाशके मिळविण्यात अडचणी येत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
हृदयेश चौहान यांनी कारखान्यात होणारा ब्रेक डाऊन, शेतकऱ्यांना नव्या पद्धतीच्या उसासाठी बाहेर जावे लागत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी गळीत हंगामात ऊस यार्डमध्ये पुरेशा सुरक्षा व्यवस्थेचीही मागणी केली. ऊस आयुक्तांनी शेतकऱ्यांना या सर्व अडचणी सोडविण्याचे तसेच उत्तर प्रदेशातील शेतांच्या सर्वेबाबात मुरादाबादच्या ऊस आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. किटकनाशके, खते वेळेवर उपलब्ध करून दिली जातील, तोडणी पावत्यांबाबतही आदेश देऊ असे ते म्हणाले,
आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दोनशे प्रगतशील शेतकऱ्यांची यादी करण्यास सांगितले. त्या शेतकऱ्यांना अधिक मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी सरपंच पंकज कुमार, नरेश,नीरज, मोती सिंह, रामपाल, जसवंत, जयप्रकाश, महेंद्र सिंह, अमित, शेखर, खीमानंद आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link