महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात अधिक सोलापूर विभागात ३४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार १७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सोलापूर विभागात आतापर्यंत २७.४३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. आतापर्यंत २१.९३ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. सरासरी साखर उतारा ७.९९ टक्के आहे.
आतापर्यंत, राज्यात एकूण १४४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ७० सहकारी आणि ७४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ११९.४४ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १०३.७४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी साखर उतारा ८.६९ टक्के आहे.
सर्वात जास्त साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. आतापर्यंत येथे ३२.७४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.