अमरावती : आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसानंतरही मजूर टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. मात्र, यंदाही परिस्थिती सुधारलेली नाही. सातत्याने सुरू असलेला लॉकडाऊन आणि इतर कामांमुळे शेती करताना समस्या येत आहेत. गेल्या वर्षी कामगार आपल्या गावांकडे परत गेले होते. यातील बहुसंख्य कामगार परतले नाहीत. त्यामुळे हॉटेल उद्योग, उत्पादन क्षेत्र, कारखाने आणि कृषी क्षेत्राला कामगारांची टंचाई भासत आहे.
कामगारांच्या कमतरतेमुळे कृषी क्षेत्राला फटका बसला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशापाठोपाठ आंध्र प्रदेशमध्येही भात, कापूस, मिरची, ऊस आणि भुईमुग अशा मुख्य पिकांच्या शेतीचे क्षेत्र अधिक आहे. शेजारील राज्यांतील हजारो मजूर कामाच्या शोधात आंध्र प्रदेशात येतात. शेतीतील कामांमध्येही ते शेतकऱ्यांना मदत करतात. हंगाम संपल्यानंतर शेतकरी आपापल्या गावाकडे परततात. मात्र यंदा कामगार एप्रिलनंतर आंध्र प्रदेशात आलेले नाहीत. कामगारांच्या कमतरतेमुळे शेतकरी गोंधळात आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link