कोल्हापूर, 23 मे 2018 : देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर उत्पादन पुणे विभागात आणि त्यातही कोल्हापूर जिल्ह्यात होते. मात्र, साखरेच्या दर घसरणीचा सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांने सध्या 750 कोटी रुपयांच्या शॉर्ट मार्जिनमध्ये (अपुरा दुरावा)असल्याने कारखाने अडचणीत आले आहेत. याच कारणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपीची पूर्ण रक्कम दिलेली नाही. जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांमधून जानेवारी अखेर 2018 पर्यंत सुमारे 60 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यात साखरेचे दर घसरल्याने प्रत्येक साखर कारखाना 30 ते 40 कोटी रुपयांपर्यंत शॉर्टमार्जिनमध्ये गेले आहेत. याचा फटका ऊस दर देण्यावर झाला. कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी साखर हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांनी प्रतिटन उसाला 3500 रुपये दर मागितला होता. यावेळी प्रतिक्विंटल साखरेची किंमत 3500 ते 3600 रुपये होती. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रतिटन उसाला 3000 रुपयांपर्यंत दर देणे शक्य झाले. प्रत्यक्ष गाळप हंगाम सुरू होताच पंधरा ते वीस दिवसातच प्रतिक्विंटल साखरेचे दर सरासरी 500 रुपयाने घटले. त्यामुळे, बॅंकांकडून साखरेच्या किंमतीच्या तुलनेत होणारे मुल्यांकनही कमी झाले. दर कमी झाल्यानंतर बॅंकांनी प्रतिक्विंटल साखरेसाठी 3100 रुपये मुल्यांकन केले. यातून 85 टक्के म्हणजे 2600 रुपये प्रतिक्विंटल उचल मिळाली. यापैकी 750 रुपये प्रक्रिया खर्च, बॅंकेने दिलेल्या कर्जाच्य हप्ते, यामध्ये कारखान्यांच्या हातात 1880 रुपये ऊस दर देण्यासाठी रक्कम शिल्लक राहत आहेत. यामध्ये उसासाठी प्रतिटन 3000 रुपये देणे शक्य होत नाही. तर, एफआरपीनूसार ठरलेला दर तत्काळ द्यावा, यासाठी शासन नोटीस बजावत आहे. तर विविध संघटना कारखान्यांवर एफआरपी देण्याबाबत दबाव टाकत आहेत. दरम्यान, शासन घेत असलेल्या प्रति क्विंटल ३००० रुपये किमान दरामुळे दिलासा मिळणार आहे.
Recent Posts
सोलापूर : दामाजी साखर कारखान्याला एनसीडीसीकडून १०० कोटी मंजूर
सोलापूर : आर्थिक संकटात सापडलेल्या मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यास एनसीडीसीकडून १०० कोटी रुपये कर्ज मंजूर झाले आहे. एनसीडीसी कर्ज मंजुरीमध्ये...
महाराष्ट्र : राज्यातील १२० कारखान्यांचे गाळप समाप्त, ८७ कारखाने सुरूच
पुणे : यंदा राज्यातील १२० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. तर राज्यातील ८७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अद्याप सुरू आहे. यंदाचा ऊस...
ब्रजनाथपुर चीनी मिल का पेराई सत्र समाप्त
हापुड़ : ब्रजनाथपुर चीनी मिल का पेराई सत्र समाप्त हो गया।आपको बता दे की, मिल ने करीब 52.50 लाख क्विंटल गन्ने की पेराई की,...
Government mandates weekly declaration of wheat stock
To uphold food security and curb hoarding and speculative practices, the Government of India has mandated that Traders/Wholesalers, Retailers, Big Chain Retailers, and Processors...
સીઝન 2023-24: જાણો મહારાષ્ટ્રમાં કયા વિભાગમાં કેટલી ખાંડનું ઉત્પાદન થયું અને શુગર રિકવરી શું...
મહારાષ્ટ્રમાં હજુ પણ ખાંડનું ઉત્પાદન ચાલુ છે અને મોટી સંખ્યામાં ખાંડ મિલોએ પિલાણ કરવાનું બંધ કરી દીધું છે. હાલમાં રાજ્યમાં ખાંડનું ઉત્પાદન આશરે 106...
શેરડીની અછત સિંભાવલી શુગર મિલ ટૂંક સમયમાં બંધ થશે
હાપુરઃ સિંભાવલી શુગર મિલ હાલમાં શેરડીની અછતનો સામનો કરી રહી છે.જેના કારણે મિલના પિલાણમાં અડચણ આવી રહી છે.મિલમાં શેરડી નહીં હોવાની સ્થિતિ છે,તેથી મેનેજમેન્ટ...
हम गन्ने का रेट 400 पार पहुंचाएंगे: रालोद के जयंत चौधरी का दावा
बिजनौर : लोकसभा चुनाव के मद्देनजर रालोद प्रमुख जयंत चौधरी ने गन्ना रेट का मुद्दा छेड़ा, और उन्होंने दावा किया की गन्ना मूल्य हम...