मुंबई : महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मुंबईसह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे तापमानात घसरण नोंदवली जाईल. पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यासह अनेक ठिकाणी या पूर्ण आठवड्यात ढगाळ हवामान राहील. तर नागपूरमध्ये १७ एप्रिलपासून पुन्हा उष्णतेची लाट सुरू होण्याची शक्यता आगे. याशिवाय महाराष्ट्रातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये मध्यम अथवा समाधानकारक स्थितीत असल्याची नोंद झाली आहे.
बुधवारी मुंबईत कमाल तापमान ३५ तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहील अशी शक्यता आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल. हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत ९२ नोंदवली गेली आहे. पुण्यात कमाल तापमान ३९ तर किमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. दुपारनंतर येथेही ढगाळ वातावरण असेल. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत १८८ नोंदवली आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान ४१ तर किमान २६ डिग्री सेल्सिअस राहील. येथेगी ढगाळ वातावरण राहणार आहे. नाशिकमध्ये कमाल ३९ तर किमान २१ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. तर औरंगाबादमध्ये कमाल ४१ आणि किमान २५ डिग्री सेल्सिअस असेल. हवेची गुणवत्ता ११६ नोंदवली आहे.