सोलापूर विभागात १६०.१३ लाख क्विंटल साखर उत्पादन

पुणे : चालू हंगामात काही साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद करण्यास सुरुवात केली आहे. साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने कारखान्यांनी हंगामात सहभाग नोंदविला. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२१ पर्यंत १८७ कारखान्यांनी गाळप केले आहे. राज्यात ८८६.५२ लाख टन उसाचे गाळप झाले असून ९१८.५५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के इतका आहे.
आतापर्यंत राज्यात ४१ कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर विभागात सर्वाधिक २९ कारखान्यांनी ११ मार्च २०२१ अखेर काम बंद केले. सोलापूर विभागात १७१.६० लाख टन उसाचे गाळप झाले असून १६०.१३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर विभागात ७ कारखाने, अमरावती विभागात २ आणि नांदेड, औरंगाबाद, पुणे विभागात प्रत्येकी १ साखर कारखाना बंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here