महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम गतीने सुरू आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ७४८.८५ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ७५५.१६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.०८ टक्के आहे.
राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात भाग घेतला आहे. येथे ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १७७.७६ लाख टन उसाचे गाळप करून १६१.५१ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे.