नांदेड विभागात ४४ लाख ७२ हजार क्विंटल साखर उत्पादन

नांदेड : नांदेड विभागात २९ साखर कारखाने गाळप करीत आहेत. कारखान्यांनी एक जानेवारीअखेर ५० लाख २२ हजार २८४ टन उसाचे गाळप केले असून ४४ लाख ७२ हजार ६९५ क्विंटल साखरचे उत्पादन घेतले आहे. साखरेचा सरासरी उतारा ८.६१ टक्के आहे. नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांत गतीने गाळप सुरू असल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावळ दिली.

यंदाच्या गाळप हंगाम, २०२३-२४ साठी ३० कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले होते. यातील २९ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला. यात १९ खासगी, तर १० सहकारी साखर कारखाने आहेत. विभागात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ११ साखर कारखाने सुरू आहेत. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यात सात कारखाने सुरू झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात सहा कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. तर हिंगोली जिल्ह्यात एकूण पाच कारखाने ऊस गाळप करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here