ऊस थकबाकीसाठी भाकियू चे साखर कारखान्यावर धरणे आंदोंलन

ऊस थकबाकीवर व्याज देण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान यूनियन ने साखर कारखान्यावर धरणे आंदोलन केले. दरम्यान साखर कारखाना अधिक़ार्‍यांना घेरावही घातला. मुख्य व्यवस्थापकांनी साखर कारखान्याचे गाळप सुरु होण्यापूर्वी सर्व थकबाकी भागवण्याचे आश्‍वासन दिले. मंगळवारी साखर कारखान्याच्या प्रांगणात तालुका स्तरीय पंचायत झाली. वक्त्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना ऊसाची थकबाकी व्याजासहीत दिली जावी. ऑक्टोबर महिन्यात गाळप सुरु करावे. तालुका अध्यक्ष ठाकुर महेश सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्यावर जवळपास 42 करोड ऊस थकबाकी बाकी आहे. यावेळी उपस्थित मुख्य व्यवस्थापक डीके सक्सेना यांनी आश्‍वासन दिले की, एक दोन दिवासाच्या आत 12 करोड रुपये भागवले. उर्वरीत देय साखर कारखाना सुरु होण्यापूर्वी दिले जाईल.

बैठक़ीमध्ये विज विभागाचे एसडीओ अभय कुमार आणि देवेश कुमार आदी उपस्थित होते. वक्त्यांनी सांगितले की, जोपर्यंत ऊसाचे सर्व पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत विज विभागाकडून शेतकर्‍यांचे विज कनेक्शन कापले जावू नये. बँकानीही शेतकर्‍यांकडून वसुली करु नये. पीएम शेतकरी सन्मान निधी चे पैसे 70 टक्के शेतकर्‍यांना अजूनही मिळाले नसल्याचे सांगून लवकरात लवकर सर्वे शेतकर्‍यांना याजनेचा लाभ देण्याची मागणी केली. ब्लॉक अध्यक्ष काले सिंह यांनी सांगितले की, प्रथम बँकाकडून केसीसी तसेच विम्याच्या नावावर शेतकर्‍यांकडून पैसा लुटला जात आहे. केंसीसी जमा करण्यावर एक्स्ट्रा चार्ज घेण्यात येत आहे. तपासणीनंतर कारवाईची मागणी केली. बैठक़ीत संजीव बलियान, सतपाल सिंह, तेजपाल सिंह, बृजपाल सिंह, चौधऱी मेवाराम, आनंदपाल सिंह, महिपाल सिंह, टीटू त्यागी, परम सिंह, चौधऱी ओमप्रकाश सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here