पुणे: महाराष्ट्रामध्ये 2020-21 या गाळप हंगामासाठी ऊसाचे क्षेत्रफळ वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्य साखर आयुक्त कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या अंदाजा नुसार, गेल्या वर्षी ऊस क्षेत्र 8.22 लाख हेक्टर होते. महाराष्ट्रामध्ये ऊसाचे क्षेत्र 29 टक्के वाढून 10.66 लाख हेक्टर होण्याची आशा आहे.
ऊसाच्या वाढत्या क्षेत्राला पाहून, गाळप हंगाम यावेळी लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. चांगल्या पावसामुळे यावर्षी मोठे उत्पादन होण्याची शक्यता आहे. ऊसाच्या वृद्धीमुळे साखरेचे उत्पादनही वाढण्याची आशा आहे.
इंडियन शुगर मिल्स असोंसिएशन नुसार, ऊसाच्या शेतीचे क्षेत्रफळ अधिक असणे आणि मान्सून हंगामात चांगल्या पावसामुळे आगामी ऊस गाळप हंगाम 2020-21 च्या दरम्यान देशामध्ये साखरेचे उत्पादन 320 लाख टन होण्याचा अंदाज आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.