कोरोना: भारतामध्ये 50,356 आणखी लोक संक्रमित

नवी दिल्ली: भारतामध्ये कोविड 19 च्या 50,356 नव्या केस समोर आल्या नंतर शनिवारी देशामध्ये संक्रमणाच्या एकूण रुग्णांमध्ये वाढ होवून ही रुग्णसंख्या 84,62,080 झाली आहे. यापैकी 78 लाखापेक्षा अधिक लोक कोरोनामुक्त होण्याबरोबरच देशामध्ये रुग्णांचा बरे होण्याचा दर 92.41 टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या आकड्यांनुसार, देशामध्ये गेंल्या एका दिवसात 577 लोकांचा मृत्यु झाला. देशामध्ये संक्रमणामुळे आतापर्यंत 1,25,562 लोकांनी जिव गमावला आहे.

मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत 78,19,886 लोकांच्या बरे होण्याबराबेरच बरे होणार्‍या रुग्णांचा दर 92.41 टक्के झाला आहे. देशामध्ये कोविड 19 मुळे होणारा मृत्यु दर कमी होवून 1.48 टक्के झाला आहे. देशामध्ये कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. आकड्यांनुसार, देशामध्ये आता 5,16,632 लोकांवर उपचार सुरु आहेत, जे एकूण संख्येच्या 6.11 टक्के आहेत.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here