मागणीच्या समर्थनार्थ 26 नोव्हेंबरला संपावर जाणार साखर कारखाना कर्मचारी

बलरामपुर: वेतन विसंगती आणि इतर मागण्यांच्या समर्थनार्थ साखर कारखाना कर्मचारी आता लढाईसाठी तयार झाले आहेत. कारखाना कर्मचारी यूनियनने 26 नोव्हेंबरला आपल्या मागण्यांसाठी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी पदाधिकार्‍यांनी आपल्या मागण्यांशी संबंधीत निवेदन उप श्रमायुक्त गोंडा रचना केसरवानी यांच्या प्रतिनिधीकडे दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बलरामपुर साखर कारखाना संघर्ष समिती चे पदाधिकारी तसेच इंटक चे प्रदेश सचिव सुधांशू प्रताप सिंह म्हणाले की, यापूर्वी आम्ही कारखाना व्यवस्थापनाला वेतन पुनरीक्षण च्या संदर्भात अनेकदा मागणी पत्र देवून चर्चाही केली. शासनाला ही अवगत केले, पण शासन आणि साखर कारखाना व्यवस्थापन तंत्र सातत्याने मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्रीय श्रम संघटनेच्या अवाहनावर आता कारखाना कर्मचार्‍यांनी आर पार ची लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्यांच्या समर्थनार्थ कारखाना कर्मचारी 26 नोंव्हेंबरला संप करतील. हे आंदोलन समस्या सुटेपर्यंत सुरु राहील. यावेळी मंगल प्रसाद, शिवबक्श सिंह, बैरिस्टर सिंह, इसराईल, अजय कुमार श्रीवास्तव, सुभाष पांड्ये, अजय भारती, विश्‍वमोहन पांड्ये तसेच कमलेश शुक्ल सह सर्व कारखाना यूनियन चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here