उत्तर प्रदेशमध्ये ऊस दर लवकरात लवकर घोषित करण्याची मागणी

नवी दिल्ली: भारतीय किसान यूनियन (भाकियू) चे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी इशारा दिला की, उत्तर प्रदेश सरकारने लवकरात लवकर ऊस दर घोषित करावा, अन्यथा लखनऊ मध्ये आंदोंलन होईल. राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशातील एक 75 वर्षीय शेतकरी कश्मीर सिंह लाडी यांच्या आत्महत्येवर संवेंदना व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, सरकारने शेतकर्‍यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये.

ते म्हणाले, किसान यूनियन आणि सरकारच्या विरोधा दरम्यान आगामी चर्चेमध्ये सोमवारी एफआरपी लागू केली जावी आणि सर्व तीन विधेयकांना मागे घ्यावे, अन्यथा आंदोंलन तिव्र केले जाईल.

ते म्हणाले, असे कोणतेही उत्पादन नाही, ज्याची किंमत ते विकल्यानंतर घोषित केली जाईल, आणि उत्तर प्रदेशामध्ये ऊस शेतकर्‍यांना लुटले जात आहे. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला इशारा दिला की, ऊस शेतकरी आता शोषण सहन करणार नाहीत. आजही ऊस शेतकर्‍यांचे 4 हजार करोड रुपये देय आहेत. त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश सरकार तांदूळ आणि उस शेतकर्‍यांच्या मुद्दे लवकरात लवकर सोडवावेत अन्यथा शेतकरी लखनऊ विधानसभेच्या समोर अनिश्‍चितकालीन घेराव आंदोलन करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here