महाराष्ट्र: अहमदनगर विभागातील साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात

पुणे : महाराष्ट्रातील गळीत हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. राज्यातील सोलापूर, कोल्हापूर, नांदेड़, पुणे, अमरावती, नागपूरनंतर आता अहमदनगर विभागातील साखर कारखान्यांनीही गाळप पूर्ण केले आहे.
नगर विभागात एकूण २६ कारखान्यांनी या हंगामात सहभाग घेतला होता. सर्व कारखाने आता बंद झाले आहेत. विभागात १६९.८४ लाख टन उसाचे गाळप करून १६६.९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सद्यस्थितीत विभागातील साखर उतारा ९.८३ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

राज्यातील १८९ साखर कारखाने बंद झाले आहेत. साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २४ मे २०२१ अखेर १९० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला. राज्यात १००९.४ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०५९.२४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४९ टक्के इतका आहे.

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील सर्व ४३ तर कोल्हापूर विभागातील ३७ कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागातील २८ कारखाने बंद झाले असून औरंगाबाद विभागातील २१ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. अमरावतीमधील २ आणि नागपूर विभागातील ३ कारखान्यांचे गाळपही पूर्ण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here