हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के ऊस बिले: सुरेश राणा

संभल : भाजप सरकारने शेतकऱ्यांचे ऐंशी टक्के ऊस बिले दिली आहेत. आता उर्वरीत बिलेही हंगाम सुरू होण्यापूर्वी मिळतील असे उत्तर प्रदेश सरकारचे साखर कारखाना तथा ऊस विकास मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले. समाजवादी पक्षावर टीका करताना मंत्री म्हणाले, की सपाच्या सरकारच्या काळातील थकीत ऊस बिलेही आम्ही चुकवली आहेत. संभळ आणि असमोली विधानसभा मतदारसंघातील बूथमध्ये मंत्री राणा यांनी कार्यकर्त्यांना बूथ मॅनेजमेंटचे धडे दिले.

कॅबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी भाजप जिल्हा कार्यालयात संभळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बूथ योजनेची बैठक घेतली. त्यानंतर असमोली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची एका रिसॉर्टवर बैठक घेतली. ते म्हणाले, जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा शेतकऱ्यांचे पाच वर्षांची ऊस बिले थकीत होती. योगी सरकारने सपाच्या सरकारच्या कार्यकाळातील ऊस बिले शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे काम केले आहे. योगी सरकारने गेल्या चार वर्षात उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना जेवढी ऊस बिले दिली आहेत, ती देशाच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलेली सर्वाधिक बिले आहेत. कोरोना काळात जेव्हा तर पक्षांचे लोक ट्विटरवर व्यस्त होते, आरोप-प्रत्यारोप करीत होते, तेव्हा फक्त भाजपचे कार्यकर्ते आपला जीव धोक्यात घालून सेवाकार्य करीत होते असे मंत्र्यांनी सांगितले.
जिल्हा महामंत्री अर्जुन वाल्मिकी आणि जिल्हा उपाध्यक्ष योगेंद्र त्यागी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले. यावेळी विभागीय उपाध्यक्ष राजेश सिंघल, डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. नरेंद्र सिंह, डॉ. अनामिका यादव, हरेंद्र सिंह रिंकू, पंकज गुप्ता, पुष्पलता पाल, अंजू चौधरी, संध्या अग्रवाल, शिल्पी गुप्ता, अंकुश ठाकुर, गणेश शर्मा, नकुल ओलख , संजय सांख्यधर, अखिलेश अग्रवाल, राजेश शंकर राजू व भारत सिंह यादव यांसह मंडल अध्यक्ष, संयोजक उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here