महाराष्ट्रात कोल्हापूर विभागात साखर उतारा ११.५० टक्क्यांवर

महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम गतीने सुरू आहे. या हंगामात जादा साखर कारखाने गाळप करीत आहेत.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ७८८.५४ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ७९८.७९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.१३ टक्के आहे.

साखर उताऱ्याचा विचार केला तर महाराष्ट्रात कोल्हापूर विभाग अग्रेसर आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादनही याच विभागात झाले आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोल्हापूर विभागात १८६.६७ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे तर २१५.७२ लाख क्विंटल साखर उत्पादन आले आहे. राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. येथील साखर उतारा ११.५६ टक्के झाला आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात भाग घेतला आहे. येथे ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १८७.०७ लाख टन उसाचे गाळप करून १७०.५७ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here