अलीगड : बरौलीचे आमदार ठाकूर दलवीर सिंह यांनी जिल्हाधिकारी सेल्वा कुमारी जे. यांची भेट घेऊन त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत निवेदन दिले. साथा सहकारी साखर कारखान्यातील मशीनरी जुनी आहे. त्याचा क्षमता विस्तार व्हावा यासाठी यापूर्वी अनेकदा सरकारकडे आंदोलने केली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कारखान्याची गाळप क्षमता विस्तार करण्याची घोषणा केली होती. सध्या जुनी मशीनरी असल्याने कारखान्याचे गाळप बंद आहे.
त्यामुळे हजारो ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ऊसाच्या शेकडो ट्रॅक्टर, ट्रॉल्या उभ्या आहेत. त्यामुळे हा ऊस इतर ठिकाणच्या कारखान्यांकडे स्थलांतरीत करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची ही समस्या तातडीने सोडवावी असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा ऊस तत्काळ वजन करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर बरौलीचे आमदार साथा कारखान्यात पोहोचले. त्यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक रामशंकर यांनी ऊसाचे गाळप न झाल्याबाबत चर्चा केली. यावेळी कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कार्यकारी संचालकांनी सांगतिले.