थायलंड : ऊस उत्पादक, साखर कारखाने PM2.5 धूळ रोखण्यासाठी येणार एकत्र

बँकॉक : देशभरातील ऊस उत्पादकांच्या ३७ संघांनी तीन साखर उत्पादक कोराच उद्योग, बुरीराम शुगर फॅक्टरी आणि रयोंग शुगर यांच्यासोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करण्यात आली असल्याची माहिती ऊस आणि साखर बोर्डाचे महासचिव एकपत वांगसुवान यांनी दिली. ऊस तोडणी पूर्वी जाळण्याचे प्रकार मर्यादित करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे. एमओयूवर स्वाक्षरी करणाऱ्या कारखान्यांना कच्च्या मालाच्या दैनंदिन पुरवठ्यामध्ये १० टक्क्यंहून अधिक जाळलेल्या उसाचा वापर न करणे बंधनकारक असेल.

नवा सामंजस्य करार ७ फेब्रुवारीपासून पूर्वोत्तर विभागातील उत्पादक आणि साखर कारखान्यांसाठी तसेच १४ फेब्रुवारीपासून उत्तर, मध्य क्षेत्र आणि पूर्व समुद्र तटाकडील भागासाठी लागू असेल. वांगसुवान यांनी सांगितले की, ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांदरम्यान PM2.5 धुळीच्या बिघडलेला मुद्दा कमी करण्यासाठी करण्यात आला आहे. यासोबतच ऊस तथा साखर बोर्डाच्या विभागीय गव्हर्नरांनी शेतातील ऊस जाळण्याच्या विरोधात निर्देश जारी करावेत असे सांगण्यात आले आहे. उद्योग मंत्रालयाने ऊस आणि शुगर बोर्डला PM2.5 धूळ कमी करण्यास मदत करण्यासाठी ऊस जाळण्याचे प्रकार मर्यादीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here