नवी दिल्ली : बजेटमुळे शेती क्षेत्राच्या आधुनिकीकरणाला गती मिळेल आणि कृषी क्षेत्रातील बदलांमुळे नैसर्गिक शेतीलाही प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गंगा नदी किनारी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला आधुनिक आणि स्मार्ट बनवण्यासाठी मुख्यत्वे सात उपाययोजना सुचविल्या आहेत. सर्वात आधी गंगा नदी किनारी पाच किलोमीटर परिसरात नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले जाईल. दुसरे म्हणजे शेतकऱ्यांना शेती आणि बागायतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय पीएम गती शक्ती योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी नव्या व्यवस्थेला अधिक बळ मिळेल. तिसरे म्हणजे खाद्य तेल आयात कमी करण्यासाठी मिशन ऑईल पाम याचे सशक्तीकरण करण्यावर जोर दिला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.