इथेनॉलच्या १५१ युनिट्समुळे बिहारमध्ये वाढणार रोजगार संधी

मुंगेर : अर्थसंकल्पात बिहार राज्यात इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी १५१ कारखाने सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. याचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आले. इथेनॉल उत्पादन करणाऱ्या या युनिट्समुळे केवळ बिहारचा विकास होणार नसून बिहारमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत. इथेनॉल उत्पादनाचा फायदा केवळ इंधनासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठीही पूरक ठरणार आहे.

याशिवाय या अर्थसंकल्पात बिहारच्या विकसित शहरांतर्गत सर्व जिल्हा मुख्यालयात वृद्धाश्रम तयार करण्याची घोषणा केलेली आहे. तसेच बहुमजली घरांच्या निर्मिती करून ती बेघरांना उपलब्ध करुन देण्याची केलेली तरतुद हे चांगले पाऊल उचलण्यात आले आहे. स्वच्छ, समृद्ध गावाच्या अंतर्गत ८४७ कोटी रुपयांची तरतुद करण्याचे उचललेले पाऊलही कौतुकास्पद आहे. याशिवाय सर्व गावांमध्ये सौर ऊर्जेचा वापर केला जाणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. त्याविषयीही समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here