कवर्धा : भोरमदेव सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन तीन दिवसानंतर संपुष्टात आले. कामगारांच्या काही मागण्यांबाबत प्रशासनाने सहमती दर्शवली. चार मार्चपासून १०० हून अधिक कामगार चारसूत्री मागण्यांसाठी शुक्रवारपासून संपावर गेले होते. त्यामुळे ऊस गाळपावर परिणाम झाला होता. महागाई भत्त्यामध्ये वाढ, नियितीकरण आणि वेतन सुधारणा अशा मागण्या या कामगारांनी केल्या आहेत.
आंदोलनामुळे ऊसाचे गाळप तसेच साखरेवर परिणाम होऊ लागला होता. याशिवाय शेतकऱ्यांनाही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे कारखान्याचे व्यवस्थापक, जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांनी संघाचे संघटक, नगर पालिका अध्यक्ष ऋषी शर्मा यांच्याशी संपर्क केला. मागण्या पूर्ण करण्याबाबत मंत्री मो. अकबर यांना निवेदन देण्याचा आग्रह धरला. ऋषी यांनी मंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यांनी मागण्या त्वरीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, शर्मा यांच्यासोबत व्यवस्थापकीय संचालक भूपेंद्र कुमार ठाकुर, तहसीलदार बोडला, कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी के. के. यादव, संघाचे अध्यक्ष नरेंद्र सिन्हा, उपाध्यक्ष डाकोर चंद्रवंशी, सचिव सुदर्श पाली, प्रवक्ता लाकेश त्रिपाठी आदींनी चर्चा केली. कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचे निर्देश देण्यात आले.