हंगाम २०२१-२२ : महाराष्ट्रात आतापर्यंत ६ साखर कारखाने बंद

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यातील अनेक कारखान्यांनी गाळप बंद करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च २०२२ अखेर राज्यात ६ साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. सध्या कोल्हापूर विभागातील ६ साखर कारखाने बंद झाले आहेत.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ९ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १०१२.०७ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १०४४.०६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३२ टक्के आहे.

या हंगामात महाराष्ट्र साखर उत्पादनासह साखर उताऱ्यात चांगली कामगिरी करत आहे. राज्याात सर्वाधइक साखर उतारा कोल्हापूर विभागात नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here