बलरामपूर : तुलसीपूर साखर कारखान्याचा गळीत हंगाम १४ मार्च रोजी संपणार आहे. १२ मार्चपर्यंत सर्व ऊस खरेदी केंद्रे आणि कारखान्याच्या गेटवर ऊस स्वीकारण्यात येणार आहे. तुलसीपूर कारखान्याचे मुख्य महा व्यवस्थापक योगेश कुमार सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून हंगाम २०२१-२२ मध्ये एकूण ४९ ऊस खरेदी केंद्रे चालविण्यात आली. २२ ऊस खरेदी केंद्रांवर खुल्या रुपात ऊस खरेदी करून येथील कामकाज पूर्ण केले आहे. उर्वरीत २७ खरेदी केंद्रांचे कामकाज सुरू आहे. १२ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्याकडील ऊस कारखान्याला पाठवावा. १४ मार्च रोजी हंगाम समाप्ती केली जाणार आहे.
कारखान्याचे उप महा व्यवस्थापक डॉ. आर. पी. साही यांनी सांगितले की, तुलसीपुर साखर कारखाना कार्यक्षेत्रात नव्या हंगामासाठी ऊस लागवड गतीने सुरू आहे. आतापर्यंत ८८२१ हेक्टर क्षेत्रात ऊस लागण झाली आहे. वसंतकालीने ऊस लागणीसाठी बायो पोटॅश, ट्रायकोडर्मा तसेच बिजप्रक्रियेसाठी हेक्साटाप साखर कारखान्याकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. बलरामपूर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस बिले दिली आहेत. वाणिज्य विभागाचे अप्पर महा व्यवस्थापक बी. एन. ठाकूर म्हणाले की, कारखान्याने २०२१-२२ या हंगामात बलरामपूर कारखान्याने २८ फेब्रुवारी ते सात मार्चपर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी २८१८.७१ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.