ढाका : भारताने ‘गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट’ (जी 2 जी) पद्धतीनुसार, बांगलादेशला साखर निर्यात करण्याचा विचार सुरू केला आहे. राष्ट्रीय सहकारी ग्राहक फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (National Cooperative Consumers’ Federation of India Limited/NCCF) के कार्यकारी संचालक (MD) मनोज कुमार सेमवाल यांनी २३मार्च रोजी बांगलादेश सरकारला पत्र लिहून याबाबत विचारणा केली आहे.
बांगलादेशातील प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, बांगलादेशच्या वाणिज्य मंत्रालयाने रमजानच्या महिन्यासाठी अनुदानावर साखर, मसूर डाळ, खाद्यतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. एनसीसीएफ ‘जी 2 जी’ पुरवठा करारानुसार, बांगलादेशला साखर निर्यातीसाठी इच्छुक आहे. पत्रात म्हटले आहे की, एनसीसीएफने यापूर्वी जी २ जी पुरवठा करारानुसार वर्ष २०२०-२१ मध्ये बांगलादेशातील अन्नधान्य मंत्रालयाच्या अन्नधान्य संचालनालयासाठी भारताकडून गैर बासमती तांदळाची निर्यात केली होती. बांगलादेशचे वाणिज्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने पत्र मिळाल्यास दुजोरा दिला आहे. अलिकडेच आम्हाला पत्र मिळाले आहे. आम्ही याबाबत विचारविनिमय करीत आहोत.
एनसीसीएफकडे बांगलादेशबाबत निर्यातीसाठी गहू आणि तांदळासह अन्नधान्य खरेदी, हँडलिंग आणि निर्यातीचा चांगला अनुभव आहे. बांगलादेशमध्ये रमजानच्या कालावधीत ०.३ मिलियन टन साखरेची गरज असेल. अधिकृत आकडेवारीनुसार सरासरी दर महिन्याला ०.११ मिलियन टन साखरेची गरज असेल. सद्यस्थितीत सरकार संचलित बांगलादेश व्यापार मंडळाकडून (टीसीबी) साखर विक्री केली जाते.