उत्तर प्रदेशात आतापर्यंत ९३.१५ लाख टन साखर उत्पादन

उत्तर प्रदेशमध्ये चालू गळीत हंगामात साखर उत्पादनात घट दिसून आली आहे. मात्र ऊस बिले देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे साखर कारखाने वेळेवर ऊस बिले देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार, १३ एप्रिल २०२२ पर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ९२१.२५ लाख टन ऊसाचे गाळप करुन ९३.१५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. आणि आतापर्यंत २१,४२६.७० कोटी रुपये म्हणजे ७२.४२ टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत.

गेल्या हंगामात राज्यात १०२७.५० लाख टन ऊस गाळप करुन ११०.५९ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
महाराष्ट्राने या हंगामात उत्तर प्रदेशला ऊस आणि साखर उत्पादनात पिछाडीवर टाकले आहे. आणि राज्य देशात पहिल्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य बनून समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here