“सर्व ऊस गाळपानंतर साखर कारखाने बंद होणार”

बागपत : ऊस गळीत हंगाम समाप्तीच्या दिशेने पुढे जात आहे. अद्याप लाखो क्विंटल ऊस शेतामध्ये आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना कारखाने बंद होण्याची धास्ती सतावत आहे. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन राज्यमंत्री के. पी. मलिक यांनी सांगितले की, शेतांमधील ऊस समाप्त झाल्यानंतरच कारखाने बंद करण्यात येतील. शेतकऱ्यांनी कारखान्यांना सहकार्य करत ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवावा असे आवाहन त्यांनी केले.

याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात बागपत आणि रमाला सहकारी साखर कारखाने तर मलकपूर हा खासगी कारखाना आहे. तिन्ही कारखान्यांनी बहुतांश उसाचे गाळप केले आहे. मात्र अद्याप शेतांमध्ये ऊस उभा आहे. शेतकऱ्यांना आपल्या उसाचे गाळप होईल की नाही याची चिंता आहे. मात्र, राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देताना सांगितले की, सर्व उसाचे गाळप झाल्यानंतर कारखाने बंद होतील. मलकपूर साखर कारखान्याचे गाळप लवकरच बंद होईल असे कारखान्याचे युनिट हेड विपिन चौधरी यांनी सांगितले. मेरठ ऊस विभागाचे उपायुक्त, बागपतचे जिल्हा ऊस अधिकारी, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षकांनी कारखान्याची पाहणी केली आहे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here