महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील तापमान ४३ डिग्रीपेक्षा कमी, जाणून घ्या आज काय आहे स्थितीत

मुंबई : महाराष्ट्रात शुक्रवारी मुंबईसह अनेक ठिकाणी आकाश ढगाळ राहिल. काही ठिकाणी पाऊसही पडू शकतो. आगामी काही दिवस अशीच स्थिती राहिल. या शिवाय भारतीय हवामानशास्त्र विभागाने २० आणि २१ मे रोजी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. गुरुवारी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे कमाल तापमान ४३ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे दिसून आढळले. आणखी काही दिवसांत यात फारशा बदलांची शक्यता नाही. दुसरीकडे महाराष्ट्रात हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत नोंदवण्यात आली आहे.

एबीपी लाईव्ह डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मुंबईत गुरुवारी कमाल ३४ तर किमान २७ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. हवामान साफ राहील. वायू गुणवत्ता सूचकांक मध्यम श्रेणीत नोंदला आहे. पुण्यात कमाल तापमान ३८ तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असेल. नागपूरमध्ये तापमान ४१ आणि २६ असे राहिल. तर येथे काहीसे ढगाळ वातावरण राहू शकेल. नाशिकमध्ये कमाल तापमान ३८ तर किमान तापमान २२ डिग्री सेल्सिअस राहील. औरंगाबाद येथे ढगाळ वातावरण राहील. येथे कमाल तापमान ४१ तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here