कोल्हापूर : राज्य सरकारने पूरग्रस्त क्षेत्रातील पिकांचा समावेश विमा योजनेत केला पाहिजे अशी मागणी माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर आणि जिल्ह्यातील सर्व पिकांना विमा संरक्षण मिळाले पाहिजे. विमा योजनेत सद्यस्थितीत खाद्यान्न, तेलबिया आणि डाळींचा समावेश आहे. ही पिके या दोन जिल्ह्यांमध्ये फारशी घेतली जात नाहीत.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ते म्हणाले की, येथील शेतकरी ऊस, भाजीपाला, द्राक्षे आणि भाताचे उत्पादन घेतात. भात उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते. कारण, हे पिक जेथे नदीचा पूर येतो अशा क्षेत्रात घेतले जाते. राजू शेट्टी म्हणाले की, २०१९ आणि २०२१ मध्ये पुरामुळे या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सरकारकडून कमी नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यामुळे आम्ही राज्य सरकारकडे केंद्राकडून चालविल्या जाणाऱ्या पिक विमा योजनेत पूरग्रस्त भागातील पिकांचा समावेश करण्याचा आग्रह केला आहे. त्यातून शेतकऱ्यांना कमी खर्चात नुकसान भरपाई मिळू शकेल.