मुंबई : महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांत हवामान ढगाळ राहील अशी शक्यता आहे. यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागात पश्चिमेच्या वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुसंख्य जिल्ह्यांत कमाल तापमान ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी राहिले. तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता बहुतांश शहरात चांगल्या ते मध्यम श्रेणीत नोंदविण्यात आली आहे.
याबाबत एबीपी लाइव्ह डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मुंबईत गुरुवारी कमाल ३४ तर किमान २८ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. हवामान ढगाळ राहील. वायू गुणवत्ता सूचकांक समाधानकारक श्रेणीत नोंदला आहे. पुण्यात कमाल तापमान ३७ तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असेल. वातावरण ढगाळ राहिल आणि पाऊस पडू शकतो. नागपूरमध्ये तापमान ४० आणि २५ असे राहिल. तर येथे दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण राहू शकेल. नाशिकमध्ये कमाल तापमान ३५ तर किमान तापमान २३ डिग्री सेल्सिअस राहील. औरंगाबाद येथे ढगाळ वातावरण राहील. येथे कमाल तापमान ४० तर किमान तापमान २३ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता समाधानकारक नोंदवली आहे.