महाराष्ट्राला आज उष्णतेच्या लाटेपासून दिलासा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राला गुरुवारी प्रचंड उकाड्यापासून थोडा दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मुंबईसह राज्यातील बहुसंख्य भागात ढगाळ वातावरण राहिल आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवली आहे. याशिवाय तापमानात घसरण होवून उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. हवामानातील हा बदल आणखी काही दिवस कायम राहील. यापूर्वी बुधवारी विदर्भात उष्णतेची जोरदार लाट कायम होतील. यादरम्यान, देशात राजस्थानमधील श्री गंगानगरसह राज्यातील ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४६.२ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

एबीपी लाइव्ह डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मुंबईत गुरुवारी कमाल ३३ तर किमान २९ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. दुपारनंतर गडगडाटी पाऊस कोसळेल. पुण्यात कमाल तापमान ३६ तर किमान तापमान २२ डिग्री सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये तापमान ४३ आणि ३१ असे राहिल. गडगडाटी पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान ३५ तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत आहे. औरंगाबाद येथे कोरडे वातावरण राहील. येथे कमाल तापमान ३९ तर किमान तापमान २७ डिग्री सेल्सिअस राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here