सरकार पुढील हंगामातही साखर निर्यात मर्यादित ठेवण्याची शक्यता : मीडिया रिपोर्ट्स

नवी दिल्ली : विविध प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतात या ऑक्टोबर महिन्यापासून, सर दुसऱ्या वर्षी साखर निर्यातीवर मर्यादा निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. देशांतर्गत पुरवठा नियंत्रणात ठेवणे आणि स्थानिक किमती मर्यादित ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. भारतात २०२२-२३ ऑक्टोबर-सप्टेंबर या हंगामात साखर निर्यात ६-७ मिलियन टनांपर्यंत मर्यादित केली जाऊ शकते.

या वर्षी साखरेच्या जागतिक किमती कमी करणाऱ्या घटकांमध्ये ब्राझिलमध्ये कमी झालेले साखरेचे उत्पादन आणि कच्च्या तेलाच्या वधारलेला दर याचा समावेश आहे. कच्च्या तेलाच्या किमती अधिक असल्याने साखर कारखाने इथेनॉल निर्मितीकडे अधिक लक्ष देत आहेत. पुलं हंगामात साखर निर्यात मर्यादा ६० ते ७० लाख टन एवढी असेल. मात्र निश्चित निर्यात मर्यादा २०२२-२३ च्या सुरुवातीला ठरवण्यात येईल. सरकार कोटा निश्चित करण्यापूर्वी मान्सुनच्या स्थितीचा आढावा घेईल.

सध्याच्या हंगामात सरकारने १० मिलियन टन साखर निर्यातीची मर्यादा निश्चित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here