लखनौ : समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या आजमगढ आणि रामपुर पोटनिवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दोन्ही जिल्हांत सुरू असलेल्या विकास योजनांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय या दोन्ही जिल्ह्यांतील विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण केल्या जाव्यात अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश दिले आहेत की, बिलासपूर (रामपूर) साखर कारखान्याच्या आधुनिकीकरणाच्या कामाला गती देण्यात यावी. मंगळवारी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्र्यांनी लोकांचे आभार मानले. आजमगढ आणि रामपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या
अभुतपूर्व विजयाबाबतही त्यांनी चर्चा केली.