सहारनपूर : शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची पूर्ण थकबाकी मिळेपर्यंत शेतकऱ्यांची आरसी कपात केली जाऊ नये यांसह इतर मागण्यांबाबत भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी (भानू गट) अप्पर उजप जिल्हाधिकारी रामजीलाल यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. शेतकऱ्यांची कर्जे संपूर्ण माफ करावीत अशी मागणी त्यांनी केली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर भाकियूच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, ऊसाचे पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल, किसान क्रेडिट कार्डसह कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी हप्ता कपात केला जाऊ नये. शेतकऱ्यांसाठीच्या आयोगाची स्थापना केली जावी. आणि शेतकऱ्यांसाठी वीस तास वीज पुरवठा करण्याची गरज आहे. त्यांनी सहकारी समित्यांनी युरिया, डीएपी तसेच एनपीके खतांचा पुरवठा पुरेसा करावा अशी मागणी केली. यावेळी युवा संघटनेचे राष्ट्रीय महासचिव नीरज चौधरी, पवन कुमार, शिवकुमार, सोमवीर राणा, मांगेराम शर्मा, जोनी, तकी, प्रमोद प्रधान, पिंकू नंबरदार आदी उपस्थित होते.