बागपत : विकास भवन सभागृहात आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी विजेची समस्या आणि ऊस बिलांबाबत इतर समस्यांबाबत शेतकऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला. अधिकाऱ्यांनी समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. बैठकीत अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांना वादही झाला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले. या बैठकीस जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, सीडीओ उपस्थित नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी सुरुवातील आक्षेप घेतला. कृषी उपसंचालक प्रशांत कुमार यांनी त्यांची समजूत काढली. भाकियूचे युवा जिल्हाध्यक्ष हिम्मत सिंह यांनी जंगली जनावरे शेतात घुसून पिकांचे नुकसान होत असल्याचे सांगितले. पशूपालन अधिकाऱ्यांनी अशा गावांतील शेतकऱ्यांना तारांचे कुंपण करून देण्याचे आश्वासन दिले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शबगा येथील विजयपाल यांनी सांगितले की, ऊस बिले मिळालेली नाहीत. विजेचीही खूप समस्या आहे. भाकियूचे इंद्रपाल सिंह यांनी फैजल्लापूर येथील ऊस खरेदी केंद्रावर नैथला, फैजपूर निनाना आणि फैजल्लापूरमधील अडीच लाख क्विंटल उसाची खरेदी होते. तेथे सुविधा नसल्याने वाद होत असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांसमोर दर महिन्याला विविध समस्या मांडूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी हरेंद्र दांगी, जोगेंद्र, राज नारायण, अश्विनी, रामकुमार, राजेंद्र, उपेंद्र कुमार, बिजेंद्र प्रधान, महराम सिंह आदी शेतकरी उपस्थित होते.