पंजाब: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन १५ व्या दिवशीही सुरूच

फगवाडा : भारतीय किसान संघाच्या (Doaba) नेतृत्वाखाली दीर्घ काळापासून असलेल्या ऊस थकबाकीबाबत सुरू असलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, सोमवारी १५ व्या दिवशीही सुरुच राहिले. जर भगवंत मान सरकार आणि स्थानिक साखर कारखान्याकडून त्यांची ऊस बिलाची ७२ कोटी रुपयांची थकबाकी लवकरात लवकर देण्याची मागणी पूर्ण केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

याबाबत, द ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बीकेयूचे (Doaba) नेते सतनाम सिंह साहनी म्हणाले की, राज्य सरकारने शेतकऱ्यांना हरियाणातील डिफॉल्टर साखर कारखान्याची संपत्ती विक्री केल्यानंतर थकबाकीतील २३ कोटी रुपयांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे. साहनी यांनी सांगितले की, आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी फगवाडा येथे २५ ऑगस्ट रोजी विविध शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here