सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याने आतापर्यंत उच्चांकी गाळपासह साखर उत्पादनातही नवा विक्रम नोंदवला आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी सांगितले. कारखाना शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबद्ध आहे आणि शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आगामी गळीत हंगामात त्याच्या गाळप क्षमतेचा १०,००० टन प्रती दिन पर्यंत विस्तार केला जाणार आहे, असे ते म्हणाले. परिचारक यांनी सांगितले की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १.४ लाख टन ऊस उपलब्ध आहे. आणि भविष्यातील गरज लक्षात घेता पुढील हंगामापू्र्वी त्याची गाळप क्षमता १० हजार टनापर्यंत वाढविली जाईल. याशिवाय प्रती दिन एक ते दीड हजार टन रसापासून थेट इथेनॉल उत्पादन प्रक्रियाही सुरू केली जाईल.
परिचारक म्हणाले की, कारखान्याला ११ पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले आहे.त्यांनी दावा केला की, कारखान्याला जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देणारा म्हणून ओळखले जाते. यावेळी पंढरपूर बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप घाडगे, उपाध्यक्ष कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकराव मोरे, वसंतराव देशमुख, हरीश गायकवाड, ज्ञानदेव धोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार, भगवानराव चौगुले, भैरू वाघमारे, लक्ष्मण धनवाडे उपस्थित होते.