ऊस दर ५०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी

डोईवाला : अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात सरकारने ऊस दर ५०० रुपये प्रती क्विंटल जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक ठराव मंजूर करण्यात आले. ऊस सोसायटीच्या सभागृहात अखिल भारतीय किसान सभेचा हा जिल्हास्तरीय मेळावा सुरू आहे. यावेळी शेतकऱ्यांनी ऊस दर ५०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी केली. साखर उतारा घटल्यावर कारखान्यांकडून कमी दर देण्याच्या निर्णयालाही तीव्र विरोध करण्यात आला.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, परिषदेत ऑनलाइन तोडणी पावतीच्या प्रक्रियेस शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. मोकाट जनावरे आणि जंगली जनावरांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावेळी सीटूचे विभागीय महामंत्री राजेंद्र नेगी, जिल्हा सचिव लेखराज, किसान सभेचे प्रदेश कोषाध्यक्ष शिव प्रसाद देवली, राजेंद्र प्रसाद पुरोहित आदींनी मार्गदर्शन करण्यात आले. बलबीर सिंह, जगजीत सिंह, पूरण सिंह, सिंगा राम, अनुप कुमार पाल, सरजीत सिंह, सत्यपाल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here