बिले थकवणाऱ्या कारखान्याला ऊस न पाठविण्याचा बारा गावांतील शेतकऱ्यांचा निर्णय

हापूड : उसाची बिले न दिल्याने त्रस्त असलेल्या १२ गावांतील शेतकऱ्यांनी सिंभावली साखर कारखान्याला ऊस न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी ऊस समितीच्या सचिवांना निवेदन देऊन मवना, चंदनपूर, असमौली, साबितगड, अनामिका या साखर कारखान्यांची केंद्रे गावात सुरू करण्याची मागणी केली. समितीच्या सचिवांनी शेतकऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव तयार करून ऊस आयुक्तांकडे पाठवला आहे. याशिवाय हापूड ऊस समितीच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना केंद्र मिळावे, अशी मागणीही लावून धरली आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यंदा जिल्ह्यात ४१,९४६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. साखर कारखान्याकडून उसाचे पैसे देण्यास उशीर होत असल्याने शेतकरी या पिकापासून दूर जावू लागले आहेत. गेल्या वर्षभरात उसाचे क्षेत्र दोन टक्क्यांनी घटले आहे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सध्या ऊस खरेदी केंद्रे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत सिंभावली साखर कारखान्याशी संबंधित अनेक गावांतील शेतकऱ्यांनी आता कारखान्याला ऊस पाठवण्यास नकार दिला आहे. ऊस समित्यांना निवेदन देऊन अन्य जिल्ह्यातील साखर कारखान्याची केंद्रे गावोगावी सुरू करण्याची मागणी केली आहे. समितीच्या सचिवांनी शेतकऱ्यांचा हा प्रस्ताव ऊस आयुक्तांकडे पाठवला आहे. हापूड ऊस समितीशी संबंधित अनेक गावांनी इतर जिल्ह्यांनाही ऊस पुरवठा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाकियूचे जिल्हाध्यक्ष पवन हूण यांनी बारा गावांतील केंद्र बदलाच्या प्रस्तावावर योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. सिलारपूर, शैदपूर झाडीना, हिरणपूर, आलमपूर भगवंतपूर, बगदपूर, वाळवापूर, पलवारा, अल्लाबक्षपूर, बिहुनी, तिवडा, दत्तियाना, रसूलपूर या गावांनी केंद्र बदलाची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here