पुणे : महाराष्ट्रातील औरंगाबाद विभागात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विक्रमी ऊस उत्पादन होण्याचे अनुमान आहे. गेल्यावर्षी हंगामामध्ये अतिरिक्त उसाचा मुद्दा सर्वांच्या चिंतेचा विषय बनला होता. या वर्षी अतिरिक्त ऊस उत्पादन होईल, अशी शक्यता आहे.
ABPLive मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्यात औरंगाबाद विभागात ऊसाचे लागवड क्षेत्र २० टक्के वाढ झाली आहे. आणि अतिरिक्त उसाच्या समस्येमुळे या वर्षीही शेतकरी आणि कारखानदारांच्या चिंतेमध्ये आताच भर पडली आहे.
औरंगाबाद विभागात २०२२-२३ मध्ये २ लाख ३ हजार ७९० हेक्टर क्षेत्रात ऊस उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षी १ लाख ६७ हजार हेक्टर ऊस उपलब्ध होता. यावर्षी यामध्ये जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्षीही अतिरिक्त उसाची समस्या निर्माण होऊ शकते.