शामली : थकीत ऊस बिलांबाबत चार गावातील शेतकऱ्यांनी पंचायतीचे आयोजन केले होते. ऊस बिले न मिळाल्यास शामली कारखान्यावर बहिष्कार घालण्याची घोषणा त्यांनी केली. कंडेला येथील चौकात कंडेला, शेखुपुरा, हिंगोखेडी व जगनपूर गावातील शेतकऱ्यांची सभा झाली. शेतकऱ्यांनी शामली साखर कारखान्याने ऊस बिले न दिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ऊसाची बिले चौदा दिवसांत देण्याचा नियम आहे. मात्र, दीर्घ काळापासून शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. मुलांचे शिक्षण, शेतीचा खर्च यासाठी पैसे नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत असे सांगण्यात आले. पंचायतीमध्ये शामली कारखान्यावर बहिष्कार घालावा असे ठरले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कंडेला गावचे माजी सरपंच रामबीर सिंह चौहान यांनी कारखान्याने ऊस बिले दिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे कारखान्याला ऊस न पाठवता बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे ते म्हणाले. सुरेंद्र मुखिया, जगनपूर, कनक सिंह, हिंगोखेडी, माजी सरपंच राकेश कुमार, मदन सिंह, विल्यम चौहान, बबलू, अमित, मदन, सुरेंद्र, श्यामा आदी उपस्थित होते.