अहमदनगर: साखर कारखान्याच्या कामगारांचा आंदोलनाचा इशारा

राहुरी : तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी मंगळवारी थकीत वेतनासाठी आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत सकाळमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जर कामगारांनी मागण्या मान्य केल्या नाहीत, तर न्यायालयात जाण्याचा आणि उपोषणाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. अलिकडेच कारखान्याच्या संचालक मंडळाने सांगितले की, यावर्षी ते कारखाना सुरू करण्यास असमर्थ आहेत. त्यानंतर कर्जदाता जिल्हा बँकेने कारखान्याच्या प्रवेशद्वार बंद करून मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे कामगारांच्या जगण्याचे साधन हिरावले गेले आहे. जिल्हा बँकेने १११ कोटींच्या कर्जापोटी कारखाना सील केला आहे.

आंदोलनाचा निर्णय श्रमिक संघाचे अध्यक्ष गजानन निमसे यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांच्या चिंतन बैठकीत घेण्यात आला. यावाळे कामगार नेते इंद्रभान पेरणे, अर्जुन दुशिंग, सचिन काळे, सुरेश थोरात, चंद्रकांत कराळे, सीताराम नालकर यांनी स्थायी, सेवानिवृत्त, वेतन उपस्थिती आणि एकत्रित मजुरीबाबत कारखान्याने कामगारांवर अन्याय केल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here