नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, साखर उद्योगासाठी २०२३ हे एक चांगले वर्ष आहे. आणि उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. बीक्यू प्राइमसोबत चर्चा करताना इस्माचे महासंचालक जॉय मोहंती यांनी सांगितले की, १११ लाख टन उच्चांकी निर्यातीसह आणि इथेनॉलच्या उच्चांकी उत्पादनामुळे गेले वर्ष सर्वात चांगले राहिले आहे. यासोबतच ते म्हणाले की, २०२३ मध्येही विकास सुरुच राहील. सरकारने आधीच ६० लाख टन साखर निर्यातीची घोषणा केली आहे. या वर्षासाठी आमच्या उत्पादनाचा दृष्टिकोन पाहता, जानेवारीच्या अखेरीस अतिरिक्त साखर निर्यातीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले की, साखर हे एक असे क्षेत्र आहे, जे २०२३ मध्ये सर्वांचे नेतृत्व करेल. आम्ही गुंतवणूक, हवामान बदल यांसह सर्व महत्त्वाच्या बाबींमध्ये नेतृत्व करू. भारताचे निव्वळ साखर उत्पादन जवळपास ३६५ लाख टन होईल, असे अनुमान आहे. आमच्याकडे ५५ लाख टनाचा सुरुवातीचा साखर साठा आहे. चांगल्या उत्पादनामुळे आम्ही सातत्याने उत्पादन वाढीच्या मार्गावर आहोत. लागवड क्षेत्र तेच असले तरी, पिकातील वैविध्य, चांगल्या कृषी पद्धतींमुळे उत्पादन वाढत आहे.