ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस उत्पादनाकडे कल

पुणे : महाराष्ट्रातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी कापूस लागवडीमध्ये वाढता रस दाखवत आहेत. ऊस लागवडीतून मिळणाऱ्या कमी नफ्यापेक्षा कापसापासून मिळणारे उत्पन्न अधिक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी उसाखालील क्षेत्र कमी करून कापूस पिक घेण्याचे नियोजन करत आहेत.

याबाबत टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, कापसामधून मिळणाऱ्या जास्त उत्पन्नासोबतच शेतात इतर पिकांची लागवड केल्याने अतिरिक्त उत्पन्न मिळते. ऊस लागवडीबाबत असे होत नाही. गेल्या दोन वर्षांत कमी भांडवली गुंतवणूक आणि जास्त उत्पन्न यामुळे शेकडो ऊस उत्पादक कापूस लागवडीकडे वळले आहेत. श्रीरुर कृषी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा बदल सकारात्मक म्हणून पाहिला जात असला तरी आगामी काही महिन्यांत आणखी बरेच बदल होतील अशी शक्यता आहे.

शिरुरचे कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे म्हणाले की, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २५० हेक्टर क्षेत्रात कापूस पिक घेतले जात आहे. या शेतकऱ्यांच्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे. कापूस लागवडीच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता सुधारण्यास अनेकांना मदत होईल. उसासाठी जास्त पाणी लागल्यामुळे मातीचा दर्जा खालावत गेला आहे. खतांची जास्त गरज असल्याने उसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांना एका एकरात ऊस लागवड करण्यासाठी किमान ३०,००० रुपयांचे भांडवल आवश्यक आहे, त्यामुळे अनेक उत्पादकांना ते परवडणारे नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here