साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस बिले अदा

जहांगीराबाद : जहांगीराबाद परिसरात असलेल्या किसान सहकारी साखर कारखान्याने १३ डिसेंबरपर्यंत पुरवठा झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना दिली आहे. साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक राहुल कुमार यादव यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली आहे.

याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार,सुमारे १२ हजार ५०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर २५४५.६५ लाख रुपये जमा करण्यात आल्याचे मुख्य व्यवस्थापकांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की ऊस उत्पादकांची बिले देणे ही कारखान्याचा प्राधान्य आहे. मुख्य व्यवस्थापक राहुल कुमार यादव यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ११ जानेवारी अखेरपर्यंत १४,९१,४०० क्विंटल उसाचे गाळप करून ८.७३ टक्के साखरेचा उतारा मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साखर उतारा अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here