उत्तर प्रदेशमध्ये २०,००० कोटी रुपयांची भात, ऊस बिले अदा

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना भात आणि ऊस पिकासाठी गेल्या चार महिन्यांत २०,००० कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये उसाचे गाळप आणि भात खरेदीचा हंगाम सुरू आहे. या आर्थिक हंगामात एकूण कृषी बिले दुप्पट दिली जातील, अशी अपेक्षा आहे. खासगी आणि सरकारी मालकीच्या कारखान्यांकडून ९,००० कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत.

ऊस आणि साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, राज्य सरकार शेतकऱ्यांना लवकर ऊस बिले देण्यास कटिबद्ध आहे. आणि यावर नियमित देखरेख ठेवली जात आहे. ते म्हणाले की, साखर कारखान्यांना ऊस बिले देण्याबाबत कडक निर्देश जारी करण्यात आले आहेत. आणि याचा सातत्याने आढावाही घेतला जात आहे. सद्यस्थितीत ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या हंगामात, ९,१४४ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. एकूण थकबाकीच्या हे प्रमाण ७१ टक्के आहे.

उत्तर प्रदेशात १२० साखर कारखान्यांपैकी खासगी कंपन्यांचे ९३ युनिट्स आहेत. तर २४ सहकारी आणि तीन युपी राज्य साखर महामंडळाचे कारखाने आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here