बंदी असलेला ऊस कारखान्याने स्वीकारल्याने शेतकऱ्यांना दिलासा

सुगौली : गेल्या दोन वर्षांपासून बंदी घालण्यात आलेला २०६१ प्रजातीचा ऊस यंदा तिसऱ्या वर्षी कारखान्यांनी स्वीकारल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बंदी असलेल्या उसाचे बिलही लवकरच दिले जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारखान्याने सुरुवातीला हा प्रतिबंधीत ऊस स्वीकारण्यास नकार दिल्याने शेतकरी हिरमुसले होते. आता सुगौलीच्या एचपीसीएल साखर कारखान्याच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एचपीसीएल साखर कारखान्याचे विजयकुमार दीक्षित यांनी सांगितले की, उसाची २०६१ ही प्रजाती चांगला उतारा नसल्याने त्याच्या लागवडीस दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आली आहे. तरीही शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये उगवण झालेले खोडवा पीक स्वीकारले नाही तर मोठे नुकसान होईल. त्यामुळे इतर कोणत्याही कारखान्याने २०६१ प्रजातीचा ऊस स्वीकारण्यास नकार दिला असताना शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन अंतिम स्वरुपात हा ऊस आम्ही स्वीकारत आहोत. या उसामुळे खरेतर कारखान्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे पुन्हा याची लागवड शेतकऱ्यांनी करू नये असे आवाहन त्यांनी केले. कारखान्याच्या या निर्णयाबाबत शेतकरी नरेंद्र यादव, मुरारी नायक, झुन्नू शर्मा, दीपू मिश्रा आदींनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here