ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा म्हैसूर उपायुक्त कार्यालयास घेराव घालण्याचा प्रयत्न

म्हैसूर : तीनशेहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त उपायुक्त के. कविता राजाराम यांनी आंदोलकांची भेट घेतली. तर उपायुक्त डॉ. के. व्ही. राजेंद्र यांनी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दोन दिवसांत या मुद्याची सोडवणूक केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांनी या निदर्शनांचे नेतृत्व केले.

ते म्हणाले, राज्यात इथेनॉल उत्पादन करणाऱ्या साखर कारखान्यांनी हंगाम २०२२-२३ साठी केंद्र सरकारकडून निश्चित केलेल्या उसाच्या योग्य लाभदायी दरासोबत (FRP) प्रती टन १५० रुपये दिले पाहिजेत. इथेनॉल उत्पादन न करणाऱ्या कारखान्यांनीही एफआरपीसोबत प्रती टन १०० रुपये दिले पाहिजेत. मात्र आतापर्यंत कोणत्याही कारखान्याने अतिरिक्त पैसे दिलेले नाहीत. ते म्हणाले की, राज्यात २५ लाखांवर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ७८ साखर कारखान्यांपैकी ४० कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादन केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here