ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटीबद्ध : माजी मंत्री यतीश्वरानंद

रुडकी : लिब्बरहेडी सहकारी ऊस विकास समितीच्या वार्षिक बैठकीत माजी कॅबिनेट मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी समिती पारदर्शक काम करीत असल्याचे सांगत कौतुक केले. राज्य सरकार सरकारच्या हितासाठी कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले. साखर कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देत आहेत. शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी यंत्र उपलब्ध करून दिली जात आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या योजना राबवल्या जात आहेत, असे यतीश्वरानंद म्हणाले. यावेळी समितीसाठी नव्या इमारतीची उभारणी, इकबालपूर सहकारी ऊस विकास समितीच्या संपत्तीचे वितरण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा पंचायत अध्यक्ष किरण चौधरी यांनी सांगितले की, समितीचे भवन तयार करण्यासाठी सहकार्य केले जाईल. बैठकीच्या अध्यक्षा रेणू राणी यांनी मार्गदर्शन केले. सुशीर राठी यांनी सूत्रसंचालन केले. माजी चेअरमन रविंद्र सिंह पनियाल, माजी अध्यक्ष नागेंद्र, मंडई समितीचे अध्यक्ष डॉ. मधू सिंह, ब्लॉक प्रमुख कविंद्र चौधरी, इकबालपूर समितीचे चेअरमन सुंदर सिंह सैनी आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here