मुंबई : महाराष्ट्रातील विविध भागात पुढील ३-४ तासांमध्ये जोरदार वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, पुढील ३-४ तासाच पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी या जिह्यात विविध ठिकाणी ३०-४० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहतील. यासोबतच या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस कोसळेल.
जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी आयएमडीने पुढील २४ तासात मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात हलका पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे तापमानात घसरण होवून उकाड्यापासून लोकांना दिलासा मिळेल.