शेतकऱ्यांना २१ कोटींच्या वितरणाबाबत मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

रुद्रपूर : किच्छा साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २१ कोटी रुपये दिल्याबद्दल किच्छाचे माजी आमदार राजेश शुक्ला यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि ऊस मंत्री सौरभ बहुगुणा यांची पटनगर येथे भेट घेतली. शुक्ला यांनी त्यांचे आभार मानले.

गुरुवारी पंतनगर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर शुक्ला यांनी सांगितले की, साखर कारखान्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन लाख क्विंटल अधिक उसाचे गाळप झाले आहे. धामी सरकारने चालू गळीत हंगामात आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ११८ कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित २८ कोटी रुपये देण्याची मागणी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांना केली. उर्वरीत पेमेंट लवकरच करण्याचे आश्वासन ऊसमंत्री सौरभ बहुगुणा यांनी शुक्ला यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here